Wednesday 27 July 2011

खरे सुख

        जगी सर्व सुखी असा कोण आहे ? असे रामदास स्वामींनी साडेतीनशे वर्षापूर्वी विचारले आहे.
            या जगरहाटीमध्ये माणसाच्या सुखाविषयी नेमकी कल्पना कोणीही करू शकलेला  नाही. किंवा रामदास स्वामींच्या प्रश्नाचे उत्तरही देवू शकलेला नाही.
            अनेक संतानी प्रबोधन करतांना सांगितले आहे की, समाधानातच  सुख आहे. समाधानी माणूस सुखी असतो.
            पण हे समाधानच माणसाजवळ टिकत नाही. त्यामुळे माणूस दु:खी होतो. याचे कारण माणसाची वर बघण्याची वृत्ती.
            मनुष्य आपल्यापेक्षा श्रीमंत असणाऱ्या किंवा श्रीमंतीचा देखावा करणाऱ्याकडे सतत पहात रहातो.आणि त्याच्याकडे जे आहे, ते माझ्याकडे नाही या विचारामुळे विनाकारण दु:खी होतो .
            समाधान मिळविण्यासाठी आपल्यापेक्षा गरीब माणसाकडे पाहिले पाहिजे. त्याच्याकडे जे नाही, ते माझ्याकडे आहे या समाधानातच खरे सुख लपले आहे. 

No comments:

Post a Comment